मालिकेत सध्या दाखवण्यात येत असलेल्या कथेनुसार, राज आणि वैदेहीच्या लग्नाच्या दिवशी कावेरीला खरं माहीत पडल्याने ती त्यांचं लग्न थांबवते. त्यानंतर कावेरी स्वतःच्या प्रेमाची कबुली देते. राज आणि रत्नमाला कावेरीला मागणी घालण्यासाठी गुहागरला जातात. मात्र तिचे तात्या राज आणि कावेरीच्या लग्नाला नकार देतात. यापुढे तात्या लग्नासाठी राजसमोर एक अट ठेवतात ती म्हणजे त्याने आईची सर्व संपत्ती सोडून गावाला राहायला यावं आणि स्वकमाईवर जगून दाखवावं. राजही ही अट मान्य करतो आणि गावातच राहायचं ठरवतो. आता राज तिथेच राहून आपल्या प्रेमाची परीक्षा देणार आहे. ही संपूर्ण कथा सलमानच्या ‘मैंने प्यार किया’ चित्रपटातील आहे. त्यामुळे प्रेक्षक लेखकाला काहीतरी नवीन लिहिण्याचा सल्ला देतायत.
एका युझरने लिहिलं, ‘अरे काहीतरी नवीन लिहा रे’ दुसऱ्या युझरने लिहिलं, ‘काय हे याशिवाय दुसरं काही सुचत नाही का’ आणखी एका युझरने लिहिलं, ‘अरे रमय्या वास्तमैया’ ची कथा चोरली आहे लेखकाने. प्रेक्षकांना काय समजता. काही दुसरं नवीन लिहा.’ या सहज असलेल्या कथानकामुळे मालिका आता ट्रोल होतेय.