Site icon CineShout

इतक्या वर्षांत साधा वादही नाही, गेल्या काही महिन्यांत रितेश-जिनिलियावर करण्यात आलेत तीन गंभीर आरोप

इतक्या वर्षांत साधा वादही नाही, गेल्या काही महिन्यांत रितेश-जिनिलियावर करण्यात आलेत तीन गंभीर आरोप



बॉलिवूड आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात चर्चेत असणार कुटुंब म्हणजे, अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनिलिया डिसूजा-देशमुख. रितेश आणि जिनिलिया बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत , तर त्याचे भाऊ राजकारणात. रितेशनं बॉलिवूड चित्रपटांमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केलीय. तर मराठी चित्रपटसृष्टीतही तो वेगवेगळे प्रयोग करताना दिसतो.बॉलिवूडमधलं आदर्श जोडपं म्हणून जिनिलाया आणि रितेश यांना ओळखलं होतं.पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर व्यावसायिक क्षेत्रात तीन गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

​संकल्पना चोरली?

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटाचा ट्रेलर गेल्या महिन्यात आला आणि तो वादाच्या भोवऱ्यात अडकला. कोलकाता येथील एका निर्मात्यानं या सिनेमाच्या निर्मात्यांवर कथा आणि संकल्पना चोरल्याचा आरोप केला होता.बंगाली चित्रपट दिग्दर्शक अग्निदेव चॅटर्जी यांचा मुलगा आकाशनं हा आरोप केला आहे. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये त्यानं ‘मिस्टर मम्मी’ या चित्रपटाच्या पोस्टरसह त्याच्या ‘विकी पेट से’ सिनेमाचं पोस्टर आणि कथेचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. तसंच त्यात जीमेलवरील संभाषणाचा स्क्रीनशॉटही आहे. आकाशच्या मते ‘विकी पेट से’ या चित्रपटात आयुषमान खुराना, अन्नू कपूर, भूमी पेडणेकर आणि गजराज राव यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानं शेअर केलेलं कथानक आणि ‘मिस्टर मम्मी’च्या ट्रेलरमध्ये दिसणारं कथानक मिळतं-जुळतं आहे. गरज पडल्यास ‘मिस्टर ममी’च्या निर्मात्यांवर कायदेशीर कारवाईही करू शकतो, असं आकाश म्हणाला होता.

​कंपनीकडून खुलासा

‘देश ॲग्रो’ या कृषी प्रक्रिया आधारित उद्योगासाठी वाटप करण्यात आलेल्या भूखंडाबाबत रितेश आणि जिनिलिया यांनी प्रसिद्ध पत्रक काढत खलासा केला होता.लातूर परिसरातील शेतकऱ्यांना मदत व्हावी आणि इथं कृषी आधारित उद्योगाची वाढ व्हावी या उद्देशानं देश ॲग्रोची स्थापना करण्यात आली असून, सोयाबीन प्रक्रिया आणि सोयाबीन आधारित विशेष उत्पादनं या उद्योगामध्ये घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळानं अतिरिक्त लातूर औद्योगिक वसाहतीतील भूखंड या उद्योग घटकास रीतसर आणि नियमानुसार लिजवर दिलेला आहे.

​भूखंड आणि कर्ज

लातूर एमआयडीसीमध्ये १६ जणांचे भूखंड मागणीचे प्रस्ताव एमआयडीसीकडं दोन वर्षांपासून प्रलंबित असताना रितेश देशमुख व जिनिलिया यांची कंपनी स्थापन झाल्यापासून केवळ २२ दिवसांत एमआयडीसीनं मेसर्स देश प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस भूखंड दिला आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक यांनी या कंपनीत तत्परतेनं १२० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘मेसेज देश ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी २३ मार्च २०२१ रोजी स्थापन झाली. या कंपनीमध्ये रितेश विलासराव देशमुख व जेनेलिया देशमुख हे भागीदार आहेत. स्थापनेची वेळी कंपनीचं भाग भांडवल साडेसात कोटी रुपये होतं.

​साउथचा रिमेक?

अभिनयातील कारकिर्दीनंतर रितेश ‘वेड’ या चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण करतोय. या चित्रपटात तो दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. अजय-अतुल यांचं संगीत असलेल्या सिनेमात जिनिलिया देशमुखही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री करतेय. या चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वी रिलिज करण्यात आला. यानंतर काही प्रेक्षकांनी हा दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक वाटतोय, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी रितेशला हा मजिली या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे का? असा प्रश्न विचारला आहे.



Source link

Exit mobile version