दोन लग्न झालेल्या सिद्धार्थ रॉय कपूरच्या प्रेमात पडली विद्या बालन; खूपच रंजक आहे प्रेम कहाणी


मुंबई: सिनेरसिकांमध्ये अभिनेत्री विद्या बालन हिची वेगळी ओळख करुन देणे गरजेचे भासणार आहे. तुम्ही बॉलिवूडचे चाहते आहात, तर विद्याचे अनेक लोकप्रिय चित्रपट पाहिलेच असतील! ०१ जानेवारी २०२३ रोजी विद्या ४४ वा वाढदिवस साजरा करते आहे. यादिवशी आपण तिच्या सिनेमांविषयी नाही तर खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणीविषयी जाणून घेणार आहोत. अभिनेत्रीने चित्रपट निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांच्याशी लग्न केले आहे. दोघं आजही अनेकदा रोमँटिक अंजादाज एकमेकांसोबत दिसतात. तुम्हाला माहितेय का विद्या आणि सिद्धार्थ यांनी लव्ह मॅरेज केले आहे?

विद्या ही सिद्धार्थ रॉय कपूर यांची तिसरी पत्नी आहे. त्यांनी पहिले लग्न बालपणीची मैत्रिण आरत बजाज यांच्यासोबत केले होते, मात्र त्यांनी काही काळाने घटस्फोट घेतला. यानंतर त्यांनी टीव्ही निर्माता कविता यांच्याशी लग्न केलं होतं. २०११ मध्ये हे कपल विभक्त झाले. त्यानंतर सिद्धार्थ विद्याच्या प्रेमात पडले.

हे वाचा-कधी झेब्रा क्रॉसिंग रंगवलं तर कधी सिनेमाचं पोस्टर… नानांनी पाहिलाय हलाखीचा काळ

मीडिया रिपोर्टनुसार या दोघांची पहिली भेट फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यादरम्यान बॅकस्टेजला झाली होती आणि करण जोहरने दोघांची ओळख करुन दिली होती. विद्या त्यावेळी एक यशस्वी अभिनेत्री होती. सिद्धार्थही इंडस्ट्रीतील मोठे नाव होते. त्यामुळे त्यांना सार्वजनिक ठिकाणी भेटता येत नसले, तरी त्यांच्यात बातचीत वाढली. याचेच रुपांतर प्रेमात झाले आणि अखेर दोघांनी बोहल्यावर चढण्याचा निर्णय घेतला. असेही बोलले जाते विद्याने लग्नासाठी होकार द्यायला खूप वेळ घेतला होता.

२०११ साली सिद्धार्थ यांचा दुसरा घटस्फोट झालेला आणि २०१२ साली त्यांनी विद्याशी लग्न केले. १४ डिसेंबर २०१२ रोजी त्यांनी लग्न केले. अलीकडेच त्यांनी लग्नाची १० वर्ष फूर्ण केली. सोशल मीडियावर विशेष सक्रिय असणाऱ्या विद्याने सोशल मीडियावर याबाबत पोस्टही शेअर केली होती. या दोघांनी लग्नही अत्यंत साध्या पद्धतीने केलं होतं, मुंबईतील वांद्रे याठिकाणी असणाऱ्या ग्रीन गिफ्ट नावाच्या बंगल्यात त्यांनी लग्न केलं. या लग्नात कुटुंबातील सदस्य आणि मोजका मित्र परिवार उपस्थित होता.



Source link

Leave a Reply