सुरुवातीला रुचिरा आणि रोहित यांच्या एलिमिनेशनला प्रेक्षकांचा विरोध होता. त्यानंतर हाताला दुखापत झाल्यामुळे तेजस्विनी लोणारी हिला घराबाहेर जावं लागलं. त्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले. तेजस्विनी गेल्यानंतर तीन आठवडे एकही शारिरीक खेळ खेळला गेला नाही. मग तेजस्विनीला बाहेर का काढलं, असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. आता झालेल्या अमृता देशमुखच्या एलिमिनेशनला सगळ्यात जास्त विरोध होताना दिसतोय. अनेक कलाकारांनी याविरोधात पोस्ट करत अमृताच्या एलिमिनेशनला चुकीचं म्हटलं आहे.
या सिझनमध्ये दाखवण्यात आलेले टास्कदेखील फार चांगले नव्हते. या सिझनमधील कोणताही खेळ प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यात यशस्वी ठरला नाही. त्यामुळे नेटकऱ्यांनी या सिझनचे खेळही बोअर असल्याचं म्हटलं. सुरुवातीपासूनच कार्यक्रमाचा टीआरपीदेखील फार कमी होता. तो वाढवण्यासाठी खास राखी सावंतची घरात एंट्री करण्यात आली. मात्र त्याचाही फार काही उपयोग झाल्याचं दिसून आलं नाही. पाहण्यासाठी प्रेक्षक फार उत्सुक नसल्याने टीआरपी वाढण्याऐवजी आणखी घसरला. त्यामुळे वाहिनीचा राखी नावाचा हुकमाचा एक्कादेखील फोल ठरला. आता शेवटी घरात प्रसाद, अमृता, अपूर्वा, अक्षय, आरोह, किरण आणि राखी बाकी आहेत. नुकतीच कार्यक्रमाच्या अंतिम सोहळ्याची तारीखही समोर आली. मात्र प्रेक्षक त्यासाठीही निरुत्साही दिसून आले. आम्हाला हा सीझन पाहण्यात मुळीच रस नाही अशा प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. दुसरीकडे काही नेटकरी तेजस्विनीला परत आणा अशी मागणी करताना दिसत आहेत. त्यामुळे या सिझनला बोगस सीझन म्हणून संबोधण्यात येतंय.