दिलेल्या शब्दाला जागले नाना पाटेकर, उभ्या आयुष्यात कधीच केलं नाही संजय दत्तसोबत काम


तुम्हाला १९९३ चा मुंबई बॉम्बस्फोट आठवत असेल. या स्फोटाने संपूर्ण मुंबई शहर हादरले होते. यामध्ये अनेक कुख्यात गुंडांचं नाव समोर आलं होतं. यासोबत या स्फोटाच संजय दत्तही सामिल होता. ‘सनम’ चित्रपटाचा निर्माता हनीफ कडवाला याने चौकशीदरम्यान पोलिसांसमोर तोंड उघडलं होतं आणि नाव न घेता संजू बाबाकडे बोट दाखवलं होतं. १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात २५७ लोकांचा मृत्यू झाला होता आणि ७१३ लोक गंभीर जखमी झाले होते. मुंबई पोलिसांनी १९ एप्रिल रोजी अभिनेत्याला अटक केली आणि त्याच्या घरातून एके-५६, हातबॉम्ब, काही गोळ्या, मॅगझिन्स जप्त करण्यात आली होती. २००७ मध्ये या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर मुन्नाभाईला सहा वर्षांसाठी तुरुंगवास भोगावा लागला होता.

संजयने भोगली त्याच्या वाटेची शिक्षा

बॉम्बस्फोटात संजय दत्तचं नाव आल्यानंतर अनेकांना तो निर्दोष वाटला होता. तसेच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्याला पाठिंबाही दिला होता. बॉलीवूड दिग्दर्शक सुभाष घई यांनी तर संजयची अटक हा एक कट असल्याचं म्हणत तो निर्दोष असल्याचं सांगितलं होतं. पण या सगळ्यात एक व्यक्ती अशीदेखील होती ज्यांनी उघडपणे संजयचा विरोध केला होता आणि पुन्हा कधीही एकत्र काम करणार नसल्याचं सांगितलं होतं. याचवेळी सुनावणीत संजय दत्तला सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती.

संजय दत्तची आठ महिन्यांनी शिक्षा झालेली कमी

संजय दत्तला ६० महिने तुरुंगवास भोगावा लागणार होता, त्यापैकी १८ महिने त्याने अंडरट्रायल जेलमध्ये घालवले होते, त्यामुळे २२ मे २०१३ रोजी संजयला उर्वरित ४२ महिन्यांची शिक्षा भोगण्यासाठी येरवडा कारागृहात पाठवण्यात आले होते. २०१६ पर्यंत अभिनेत्याला तिथं राहायचं होतं, पण नियमानुसार कैद्याची वागणूक चांगली असेल तर त्याची काही प्रमाणात शिक्षा माफ होते. संजू बाबाच्या बाबतीतही असंच घडले. त्याची शिक्षा आठ महिन्यांनी कमी करण्यात आली.

सुपरस्टार असताना संजय दत्तने केलेला गुन्हा

२५६ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली. शस्त्र बाळगण्याबाबत संजयने न्यायालयात स्वतःच्या बचावात सांगितलं होतं की, ‘मला माझ्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी वाटत होती. म्हणूनच हे शस्त्र मी स्वतःजवळ ठेवले होते. मी घाबरलो होतो आणि काही लोकांच्या सांगण्यावरून असं केलं.’ हा तो काळ होता जेव्हा संजयने ‘थानेदार’, ‘सडक’, ‘साजन’ आणि ‘खलनायक’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले होते. संजयला तुरुंगवासाची शिक्षा होऊनही नाना पाटेकर त्यावर खूश नव्हते.

संजय दत्तवर भयंकर संतापलेले नाना पाटेकर

नाना यांचा या बॉम्बस्फोटाशी काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर सांगा नाना यांनी त्यांचा भाऊ या स्फोटात गमावला होता. यामुळे ते संजयवर रागावले होते. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, ‘मी त्याला तशीच शिक्षा देऊ शकतो. त्याने केलेला गुन्हा भयानक आहे. त्याच्यासाठी न्यायाची वेगळी व्याख्या का? गरीब माणसासाठी कायदे वेगळे आणि मी अभिनेता आहे म्हणून माझ्यासाठी वेगळे? असं का व्हावं?’

नाना पाटेकरांनी गमावला त्यांचा भाऊ

नाना पाटेकर यांनी संजय दत्तच्या शिक्षा माफीवर प्रश्न उपस्थित केला होता. या मुलाखतीत नाना पाटेकर म्हणाले होते की, संजय दत्तने शिक्षा भोगली असली तरी मी त्याच्यासोबत कधीही काम करणार नाही. कारण त्या घटनेत त्यांनी वरळी बेस्ट बस स्फोटात भाऊ गमावला होता. नाना यांच्या म्हणण्यानुसार, ‘माझ्या पत्नीने त्यावेळी दुसरी बस घेतली नसती तर तिचाही बॉम्बस्फोटात मृत्यू झाला असता.’

संजय दत्तसाठी काय म्हणालेले नाना पाटेकर

‘याला संजय दत्त जबाबदार आहे असे मी म्हणत नाही. पण यात त्याचा हात असून मी त्याच्यासोबत काम करणार नाही. मी हे त्या लोकांसाठी करत आहे ज्यांनी या अपघातात आपले प्रियजन गमावले आणि त्यांच्या आयुष्यात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. नाना पाटेकर म्हणाले की, ‘लोक संजय दत्तचे चित्रपट पाहतात. लोकांनी त्याला हिरो बनवले, पण नंतर तेच लोक अभिनेत्याला पॅरोल का मिळतोय यावर प्रश्न उपस्थित करतात.’

जे शक्य होतं ते नाना पाटेकरांनी केलं

मी फक्त त्याच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकत आहे. माझ्या हातात जे आहे ते मी करत आहे. विशेष म्हणजे नाना यांनी आपला शब्द पाळला आणि आजपर्यंत नाना आणि संजय यांनी कोणत्याही सिनेमात एकत्र काम केलं नाही. २००६ मध्ये टॅक्सी नंबर ९२११ सिनेमा आला होता, पण त्यातही संजयने फक्त निवेदक म्हणून काम केले होते. त्याशिवाय इतर कोणत्याही सिनेमात त्यांनी काम केलं नाही.

संजय दत्त आणि गोविंदाच्या नात्यातही आला दुरावा

संजय दत्त आणि गोविंदा यांचं नातंही फारसं चांगलं राहीलं नाही. दोघांनी १९८९ मध्ये ‘दो कैदी’, १९९९ मध्ये ‘हसीना मान जायेगी’, २००१ मध्ये ‘जोडी नंबर १’ आणि २००३ मध्ये ‘एक और एक ग्याराह’ या सिनेमांत एकत्र काम केलं. मात्र त्यानंतर दोघे एकाही सिनेमात दिसले नाहीत. कारण फक्त संजय दत्त होता. खरं तर, याच्याही दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर गोविंदा आणि संजयची जोडी भन्नाट आवडली होती. पण त्यांच्या नात्यात तेव्हा दुरावा आला जेव्हा दोघांनी डेव्हिड धवन यांच्या ‘एक आणि एक ग्याराह’ सिनेमात काम करायला सुरुवात केली.

एक और एक ग्याराह सिनेमानंतर केलं नाही काम

वृत्तांवर विश्वास ठेवला तर गोविंदाला सिनेमातील एका सीनमध्ये काही बदल करायचे होते. पण डेव्हिड यांना ती गोष्ट पटली नाही आणि त्यांनी तसं करण्यास नकार दिला. संजय दत्तला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यानेही डेव्हिड यांना पाठिंबा दिला. अशा स्थितीत गोविंदा संतापला. दोघांनी कसेतरी सिनेमाचं शूटिंग संपवलं, पण बरेच दिवस दोघेही बोलले नाहीत. आणखी एक किस्सा असा की, मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तचे नाव समोर आले तेव्हा अभिनेत्याचे अंडरवर्ल्ड कनेक्शनही उघड झाले. यानंतर त्याच्या ‘कांटे’ चित्रपटाची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली होती.

पुन्हा एकत्र दिसली नाही ही ‘जोडी नंबर १’

या काळात पोलिसांनी एक टेप जारी केली होती. ज्यामध्ये संजय अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलकडे गोविंदाबद्दल तक्रार करत होता. या रेकॉर्डिंगमध्ये संजयने गोविंदाचा उल्लेख करत तो सेटवर उशिरा येत असल्याचं सांगितलं. रिपोर्टनुसार, यादरम्यान संजयने गोविंदाला शिवीगाळही केली होती. यासोबतच संजयने छोटा शकीलला गोविंदाची समजूत घालण्यासही सांगितले होते. डेव्हिड धवन यांच्या या चित्रपटानंतर दोघेही पुन्हा पडद्यावर दिसले नाहीत.



Source link

Leave a Reply