प्रेक्षकांच्या आग्रहापुढे कुणाचे चालेना! हेराफेरी ३ मध्ये अक्षय कुमारच दिसणार?


मुंबई: अक्षय कुमार याच्या हेरा फेरी सिनेमाला प्रेक्षकांची उदंड प्रतिसाद मिळाला. केवळ याच सिनेमाला नाही तर त्याच्या पुढचा भाग देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सिनेमातील राजू, श्याम आणि बाबूराव या त्रिकुटानं बॉलिवूडमध्ये धम्माल उडवून दिली. या सिनेमातून अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या तिघांची केमिस्ट्री हिट ठरली. या तिघांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं आणि सिनेमाचं असं खास स्थान निर्माण केलं आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून हेराफेरीचा तिसरा भाग येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, या तिसऱ्या भागात अक्षय कुमार नसेल अशी बातमी समोर आली. त्याच्याऐवजी कार्तिक आर्यन सिनेमात दिसणार असं सांगितलं जात होते. इतकंच नाही तर खुद्द अक्षयनं देखील या सिनेमात तो काम करणार नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्यांही प्रतिक्रिया समोर आलेल्या की, या सिनेमात अक्षयऐवजी कार्तिक असेल. यामुळे चाहत्यांमध्ये निराशेचं वातावरण होतं. या सिनेमात अक्षय कुमारलाच घेण्यात यावं अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

हे वाचा-ही नवी नग्नता आहे का? PM मोदींचे फोटो शेअर करत प्रकाश राज यांनी मारला टोमणा

हेराफेरी ३ आणि अक्षय कुमार

‘हेरा फेरी ३’ सिनेमात अक्षय नसणार ही बातमी जेव्हा बाहेर आली तेव्हा प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काही चाहत्यांनी तर थेट सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली. तर काही नेटकऱ्यांनी या सिनेमाच्या निर्मात्यांरोधात #NoAkshayNoHeraPheri अशी मोहीमच सुरू केली. त्यानंतर सिनेमाचे निर्माता फिरोज नाडियाडवाला आणि हेरा फेरीची टीम अनीस बज्मी आणि राज शांडिल्य यांच्यात चर्चा झाल्या.

पिंकविलाने दिलेल्या बातमीनुसार प्रेक्षकांनी केलेल्या मागणीनंतर सिनेमाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी हेरा फेरीच्या फ्रेंचाइजीमध्ये राजूला परत आणण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी त्यांनी अक्षयशी पुन्हा एकदा चर्चा सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, ‘कार्तिक आर्यनला हेराफेरी ३ मध्ये घेण्यासंदर्भात अनेक गोष्टी झाल्या होत्या. गेल्या १० दिवसांमध्ये फिरोजनं अक्षय कुमारची अनेकदा भेट घेतली. त्या दोघांमध्ये असलेल्या मतभेद दूर करण्याबाबत त्यांच्यात चर्चा झाली. तसंच त्यांना पुन्हा सिनेमात घेण्याबाबतही बोलणं झालं आहे. त्यामुळे सिनेमात अक्षय दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हेराफेरी मधील राजू ही भूमिका खूप लोकप्रिय आहे. ही भूमिका लोकप्रिय करण्यात अक्षयचा मोठा वाटा आहे.’

हे वाचा-आर्यन खान ड्रग केसविरोधात हिंदू महासंघाची याचिका, चढावी लागणार कोर्टाची पायरी?

‘अक्षय नाही तर हेराफेरीही नाही’

सूत्रांनी पुढं सांगितलं की, ‘हेरा फेरी अक्षय कुमारशिवाय होऊच शकत नाही. या सिनेमातील आघाडीचे कलाकार घेऊन पुन्हा एकदा सिनेमाची निर्मिती करण्याचा विचार निर्माते करत आहेत. अक्षयने देखील हेरा फेरी ३ हा सिनेमा करण्यात रस दाखवला आहे. अक्षयने हेरा फेरी ३ सिनेमा नाकारण्यामागे मानधन हे कारण नव्हतं तर सिनेमाची पटकथा हे खरं कारण होतं. सिनेमाच्या पहिल्या दोन भागांना जी लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे त्यात त्याला कोणत्याही प्रकारची तडजोड करायची नव्हती. आता अक्षय आणि निर्माता फिरोज बसून हेराफेरी ३ संदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.’

तिघांची आहे भन्नाट केमेस्ट्री

हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी या दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर भरघोस यश मिळालं आहे. या सिनेमांत अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांची भन्नाट केमिस्ट्री दिसून आली आहे. ही केमेस्ट्री मोठ्या पडद्यावर बघायला प्रेक्षकांना आवडते. त्यामुळेच हेराफेरी ३ मध्ये हे तिघेजण हवे अशी आग्रही मागणी करत सोशल मीडियावर मोहीम सुरू केली होती.



Source link

Leave a Reply