केतकी चितळेनं घेतला अमृता फडणवीसांशी पंगा, ‘राष्ट्रपिता’ वक्तव्यावर दिली थेट प्रतिक्रिया


मुंबई: अभिनेत्री केतकी चितळे आणि तिच्या वादग्रस्त पोस्ट नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. केतकी आता पुन्हा चर्चेत आली आहे आणि त्याचं कारण म्हणजे तिनं अमृता फडणवीस यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच उल्लेख राष्ट्रपिता असा केल्यानं वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नागपुरात एका मुलाखतीच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आता प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत. केतकी चितळे हिनं देखील अप्रत्यक्षपणे नाव न घेता एक पोस्ट शेअर करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाली केतकी?
सध्या जुने आणि नवीन आदर्श असा वाद सुरू आहे. जुने , नवीन राष्ट्रपिता हा वाद आता जुना झालाय. प्रत्येक दिवसागणिक भारत बदलतोय आणि हिच ती वेळ आहे की आपण आता स्वत:ही बदलायला हवं. आणखी एक म्हणजे आता हे सत्य आपण स्वीकारायला पाहिजे की, गेल्या तीनशे वर्षांपूर्वीचा संदर्भ आता १०० वर्षांवर आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी केतकीनं छत्रपती शिवाजी महाराजांवरही एक इन्स्टा स्टोरी शेअर केली होती . शेअर केलेल्या इन्स्टा स्टोरीमध्ये केतकीनं समित्यांवर परखड प्रतिक्रिया व्यक्त केली. समिती कुठली, कशासाठी आणि ती निर्माण करण्याचा विचार का आला असेल? याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. महाराजांचं नाव घेऊन सनातन धर्माला मारणं हा आमचा उद्देश. स्वघोषित मावळे तर तसंही माथ्यावर चंद्रकोर व बाईकवर राजमुद्रा (मुळात राजमुद्रा राजा सोडल्यास कुणा दुसऱ्याने वापरणे फक्त बेकायदेशीरच नव्हे तर घोर अपमान आहे. पण आम्ही स्वघोषित असल्यानं काहीही करायला मोकळे आहोत. अगदी ज्या राजाच्या नावानं लढतो, त्याचा अपमानही) लावून तयार असतातच.’ असं तिनं म्हटलं होतं.



Source link

Leave a Reply